Total Pageviews

NEWS

🖥️ सांगली जिल्ह्यातील शेती बातम्या "सांगली जिल्ह्यातील कापूस, ऊस, द्राक्षे यांच्या बाजारभावातील बदल" "जिल्ह्यातील पाऊस आणि पाण्यापुरवठा परिस्थितीविषयी अद्ययावत माहिती" "शेतकऱ्यांसाठी सरकारी योजना किंवा नवीन तंत्रज्ञानाचा अंमल" सार्वजनिक आरोग्य आणि उपचार "मिरज-सांगलीमधील सिव्हिल हॉस्पिटलची सुविधा आणि गरजा" "जिल्ह्यात मलेरिया/डेंग्यू प्रतिबंधक उपाययोजना" पर्यावरण आणि हवामान "कृष्णा नदीच्या पाण्याची सद्यस्थिती आणि धरणे" "उन्हाळ्यातील तापमानवाढीचा प्रभाव"

राज-उद्धव ठाकरे एकत्र येणार? पण बडव्यांचं राजकारण आडवं येणार का? चर्चांना मिळतोय नवा कल

 मुंबई – महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या सर्वात मोठा चर्चेचा विषय ठरला आहे तो म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या संभाव्य एकीकरणाचा. दोन बंधूंची भेट, सॉफ्ट बॉडी लँग्वेज, आणि त्यांच्या भाषणातून येणारे संकेत यामुळे हे एकत्र येण्याचे गणित अधिकच मजबूत वाटू लागले आहे.


परंतु याच दरम्यान एक प्रश्नही उपस्थित होतोय – या एकतेच्या वाटचालीत अडथळा ठरणार आहेत का त्यांच्याभोवती फिरणारे बडवे आणि चमचेगिरी करणारे सल्लागार?

ठाकरे गटाकडून गेल्या काही दिवसांत मवाळ पावलं उचलली जात आहेत. एकत्र येण्यासाठी सकारात्मक संकेत दिले गेले आहेत. शिवसेना (ठाकरे गट) अंतर्गत बैठकांमध्येही हा विषय चांगलाच चर्चेत असल्याची माहिती आहे.

मात्र मनसेतील काही जुने व प्रभावशाली नेते या विचाराला पाठिंबा देण्याऐवजी नकारात्मक सूर लावताना दिसत आहेत. “आपण स्वतंत्र पक्ष म्हणूनच वाढलो आहोत”, “शिवसेनेशी पुन्हा संधान म्हणजे विचारांशी तडजोड” असे सूर काही मनसे नेत्यांनी खाजगीत बोलताना लावल्याचे वृत्त आहे.

राजकीय वर्तुळात चर्चा आहे की, बंधूंची एकी होण्याची ही सुवर्णसंधी आहे. पण ही संधी त्यांच्याभोवतीचे बडवे गमावून टाकणार का, असा मोठा प्रश्न सध्या निर्माण झाला आहे.

या राजकीय हालचालींमुळे पुढील विधानसभा निवडणुकीपूर्वीच महाराष्ट्रात नवा समीकरण तयार होऊ शकतो. परंतु हे समीकरण प्रत्यक्षात येण्यासाठी "इगो" आणि "इनसिक्युरिटी" यांचा अडसर काढणं हेच खऱ्या अर्थाने कठीण काम आहे.

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले?

राज ठाकरे यांनी एका पॉडकास्टमध्ये, महाराष्ट्र हित आणि मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी आमच्यातील क्षुल्लक भांडणे बाजुला सारुन एकत्र येण्याचे सूतोवाच केले होते. त्याला उद्धव ठाकरे यांनी प्रतिसाद देताना भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत तडजोडी चालणार नाहीत, अशी अट घातली होती. परंतु, ही अटही उद्धव ठाकरे यांनी मागे घेतली होती. ठाकरे गटाकडून काही तासांमध्ये राज ठाकरे यांच्यासोबत एकत्र येण्यासाठी कोणतीही अट नाही, असा खुलासा केला होता. हा खुलासा ठाकरे गटाने आणखी एक पाऊल पुढे टाकल्याचे बोलले जात आहे. परंतु, मनसेच्या नेत्यांकडून वारंवार जुन्या राजकारणाचा संदर्भ देत पालिका निवडणुकीच्या तोंडावर हा मनसेला गुंतवून ठेवण्याचा नवा डाव तर नाही ना, अशी शंका उपस्थित केली जात आहे. 

देवेंद्र फडणवीस म्हणाले, घाई करू नका, थोडी वाट पाहा

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याचा सर्वाधिक मोठा फटका भाजपला बसू शकतो. हे दोन्ही भाऊ एकत्र आल्यास मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत मराठी मतांचे ध्रुवीकरण होऊन भाजपच्या जागा कमी होऊ शकतात. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सावध भूमिका घेतली आहे. कुणीही मतभेद विसरुन एकत्र येत असतील तर त्यामध्ये काहीही वाईट नाही. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर आम्हाला आनंदच आहे. या चर्चा माध्यमांमध्ये आहेत. घाई करु नका, थोडी वाट पाहा. हे दोघे एकत्र आले तर आम्ही त्याचे स्वागत करु, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

Post a Comment

0 Comments