Total Pageviews

NEWS

🖥️ सांगली जिल्ह्यातील शेती बातम्या "सांगली जिल्ह्यातील कापूस, ऊस, द्राक्षे यांच्या बाजारभावातील बदल" "जिल्ह्यातील पाऊस आणि पाण्यापुरवठा परिस्थितीविषयी अद्ययावत माहिती" "शेतकऱ्यांसाठी सरकारी योजना किंवा नवीन तंत्रज्ञानाचा अंमल" सार्वजनिक आरोग्य आणि उपचार "मिरज-सांगलीमधील सिव्हिल हॉस्पिटलची सुविधा आणि गरजा" "जिल्ह्यात मलेरिया/डेंग्यू प्रतिबंधक उपाययोजना" पर्यावरण आणि हवामान "कृष्णा नदीच्या पाण्याची सद्यस्थिती आणि धरणे" "उन्हाळ्यातील तापमानवाढीचा प्रभाव"

सोलापूरच्या या विद्यार्थ्याने केला चमत्कार! प्रत्येक विषयात मिळवले अचूक ३५ गुण

 राज्यभर दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांची यशोगाथा समोर येत आहे. मात्र या निकालात सोलापूरमधील एका विद्यार्थ्याने अनोखा विक्रम केला आहे, जो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

स्वामी विवेकानंद नगर, हतुरे वस्ती येथे राहणारा शेख इमरान अब्दुल्ला या विद्यार्थ्याने दहावीच्या प्रत्येक विषयात अचूक ३५ गुण मिळवत आपला निकाल ३५ टक्क्यांवर स्थिरावला आहे. विशेष म्हणजे, कोणत्याही विषयात तो नापास झालेला नाही, पण कुठेही अधिक गुणही नाहीत. अगदी गणित, विज्ञान, इतिहास, भूगोल, मराठी, इंग्रजी – सर्व विषयांमध्ये त्याचे गुण ‘३५’ वरच थांबले आहेत.

या अनोख्या निकालाबद्दल विचारले असता इमरानने हसत हसत सांगितले की, “बस्स, पास व्हायचं होतं! आणि प्रत्येक विषयात ते अचूक जमवलं.”

त्याने पुढे विज्ञान शाखेत अकरावीला प्रवेश घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

शेख इमरानच्या या वेगळ्या प्रकारच्या कामगिरीचे कौतुक विविध मान्यवरांकडून करण्यात येत आहे. त्याच्या आत्मविश्वासाचे आणि प्रयत्नांचे सर्वत्र स्वागत होत आहे.

Post a Comment

0 Comments